सुर्यास्तानंतर
युद्ध छावणीत अंग टेकताच
विझू घातलेल्या आकाशात
दिसतात अपार मायेने
अोथंबलेले तुझे डोळे
तुझ्या पापण काठी
रेंगाळलेला भाबडा मेघ
सांडण्या आधीच
भिजवून जातो मला
अन मग त्यात वाहुन जाते
मी अंगभर फासलेली
तत्ववेत्त्याची राख,
हटनिग्रहाचा वज्रलेप.
तुझ्या अथांग डोळ्यात
दाटलेल्या समर्पणात सापडते
मला माझीच हरवलेली
नितळ निळाई अन
विरत जातो कुरुक्षेत्रावरील
शंखनादातून उफाळलेला
असह्य दाह
खड्गांचा खणखणाट
विजयी चित्कार
अन घायाळंचं रुदन ही
मला इतकंच सांग राधे
हे दिव्य सूर ज्या वेणूतून
पाझरतायत
तिच्यावर फुंकर
घालणारे ते अोठ
नेमके तुझे आहेत
की माझे????
- गुरु ठाकूर
अहाहा काय अप्रतिम लिहिलं आहेस गुरु!
ReplyDeleteमला बासरी आणि राधा ही दोन्ही स्त्रीतत्व अद्वैत आणि अद्भुत वाटतात.
गोकुळ सोडल्यापासून कृष्णाने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही....राधा आणि बासरी दोन्ही त्याच्या प्रतीक्षेत आहेत आजवर !
❤️❤️
ReplyDelete